मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Thursday, December 18, 2008

॥ आता रडा ॥


(व्यंगोक्ति)

(वृत्त: शार्दूलविक्रीडित)

कोणी कांही म्हणोत, या कलियुगीं पैसा खरा ईश्वर
विद्यावैभव-सद्विचार जगवीती देह कां नश्वर ?
गुंडाळून शिरांस लाज, व्यवहारीं वागणे चांगले,
दारिद्र्यांत सुबुद्धिवैभव, हवें कोणांस सांगा भले ? ॥१॥

बुद्धीजीवि जिच्या शिरीं, अकुवतीचे फोंडितीं खांपर
लक्ष्मीच्या घरिं तोंयकुम्भ भरण्याला, शारदा तत्पर
पदव्याही मिळतीं इथें विकत, यें पाण्डित्य सर्वांगिण
पैश्याचे नच सोंग यें वठवितां, श्रीमंत झाल्याविण !! ॥२॥

संभावीतपणांस आचरत, मांडावें तिचे पूजन
लाथाडून तिला, प्रबुद्ध ठरले, निर्बुद्ध-निष्कांचन !!
लागे ना, उपजीविका निभविण्याला, दाम ची रोंकडा ?
ज्याच्या माल खिश्यांत, केंस न कुणी त्याचा करी वांकडा !! ॥३॥

जी विष्णूंस सुगौर भासलि, मनुष्यांना द्विवर्णी दिसे
चाले कां क्षिति बाळगून? इहलोंकीं या, भरावे खिसे !!
कोंणी मध्यमवर्गियांस न पुसे, स्वार्थीच तो कोंरडा
झाला धन्य जगून काटकसरीने जीव? आतां रडा !!! ॥४॥

****************
----- रविशंकर
२४ जुलै २००१

No comments:

Post a Comment