॥ मोरपीस ॥
(गझल)
कुठं काय झालंय् अजून ? पुष्कळ करायचं आहे
इथं कुणा लेकाच्याला, सत्तरीत मरायचं आहे ?
हौशी झाल्या, मौजी केल्या सगळ्या, म्हणून काय झालं ?
पुन्हा एकदा, विशीचं कातडं, पांघरायचं आहे
साहेबाची ऐशी-तैशी, करतां करतां राहून गेली
चाकरीतलं मिंधेपण, एकदां ठोंकरायचं आहे
तसे पांच-दहा हजार, पोष्टांत ठेंवून झालेत, पण
लाखाची नोट बघून, डोकं गरगरायचं आहे
पंचविशीत म्हटलं होतं, " साडी बरी नाही " म्हणून
साठी आली तरी, तेंच झेंगट, निस्तरायचं आहे !!
"झाली एक बस्स् पुरे, डोईजड झाली", म्हणत
मधुबालाबरोंबर, काळीज हरायचं आहे !!
पुढचा जन्म कधी, कुठं, कसला ? कुणांस ठाऊक, पण
उंदिरमामा झालो तरी, हिलाच वरायचं आहे !!
ऊन्ह-पाऊस खाऊन खाऊन, मिश्यासुद्धां पिकल्या, तरी
आठवणींचं फुलपाखरूं, ओंजळीत धरायचं आहे !!
विटीदांडू, गारगोट्या, गलोरीच्या गदाड्यांत
हमरीतुमरीवर येत, खेंळांत उतरायचं आहे
’बाबा आपल्या घराण्यांत 'रविशंकर' कोण झाले' ?
पुढच्या छप्पन्न पिढ्यांनीं, नक्की विचारायचं आहे !!
नुस्ता ’झालो’ की ’जगलो’ ?, काळच ठरवील म्हणा !
वहीमधलं मोरपीस, अजून थंरथंरायचं आहे !!!
**************
----- रविशंकर.
१० ऑगस्ट २००२
(गझल)
कुठं काय झालंय् अजून ? पुष्कळ करायचं आहे
इथं कुणा लेकाच्याला, सत्तरीत मरायचं आहे ?
हौशी झाल्या, मौजी केल्या सगळ्या, म्हणून काय झालं ?
पुन्हा एकदा, विशीचं कातडं, पांघरायचं आहे
साहेबाची ऐशी-तैशी, करतां करतां राहून गेली
चाकरीतलं मिंधेपण, एकदां ठोंकरायचं आहे
तसे पांच-दहा हजार, पोष्टांत ठेंवून झालेत, पण
लाखाची नोट बघून, डोकं गरगरायचं आहे
पंचविशीत म्हटलं होतं, " साडी बरी नाही " म्हणून
साठी आली तरी, तेंच झेंगट, निस्तरायचं आहे !!
"झाली एक बस्स् पुरे, डोईजड झाली", म्हणत
मधुबालाबरोंबर, काळीज हरायचं आहे !!
पुढचा जन्म कधी, कुठं, कसला ? कुणांस ठाऊक, पण
उंदिरमामा झालो तरी, हिलाच वरायचं आहे !!
ऊन्ह-पाऊस खाऊन खाऊन, मिश्यासुद्धां पिकल्या, तरी
आठवणींचं फुलपाखरूं, ओंजळीत धरायचं आहे !!
विटीदांडू, गारगोट्या, गलोरीच्या गदाड्यांत
हमरीतुमरीवर येत, खेंळांत उतरायचं आहे
’बाबा आपल्या घराण्यांत 'रविशंकर' कोण झाले' ?
पुढच्या छप्पन्न पिढ्यांनीं, नक्की विचारायचं आहे !!
नुस्ता ’झालो’ की ’जगलो’ ?, काळच ठरवील म्हणा !
वहीमधलं मोरपीस, अजून थंरथंरायचं आहे !!!
**************
----- रविशंकर.
१० ऑगस्ट २००२
No comments:
Post a Comment