जीव गिळुनी दु:ख, होता कांवला
वेंळ ही नव्हता मराया, ’फांवला’ !
खरडल्या मी, कागदावर वेदना
अर्थ नव्हता अक्षरीं, सामावला !!
नजर, ओंळींच्या ढिगामाजीं फिरे
सूर, गझलेने, न होता लावला
शब्द होते जड, तथापि पोंरके
भाव ही रचनेतला, सुस्तावला !!
तोंच उजळे ज्योत, कुठली अंतरीं !
प्राण, सृजनाच्या सहाय्या, धांवला !!
लेंखणीतुन रक्त, खाली ओंघळें !!!
अन् मला, हा ’शेर’ माझा, भावला !!!!
*************
----- रविशंकर.
२८ डिसेंबर २००८.

No comments:
Post a Comment